ऋतुचर्या आणि  आयुर्वेदिक जीवनशैली

Winter season

ऋतुचर्या आणि  आयुर्वेदिक जीवनशैली

निसर्गनियमानुसार  काही ठराविक काळानंतर ऋतू बदलतात.  बदल हा सृष्टीचा नियम आहे. आयुर्वेदानुसार बाहेरील बदलत्या ऋतूचा शरीरातील त्रिदोषांवर परिणाम होत असतो.  शरीराची  स्थिती व सतत बदलती बाह्य स्थिती यात सुसंवाद निर्माण होणं गरजेचं असतं. आयुर्वेद हे फक्त व्याधी आणि त्यावरील  उपचाराचे   शास्त्र नाही, तर जीवन जगण्याचे शास्त्र आहे. आयुर्वेदिक दिनचर्या, ऋतुचर्या, स्वास्थ्य आणि  आरोग्य कमवण्याचे , निरोगी राहण्याचे साधन आहे.

    ऋतुचर्या  म्हणजे आयुर्वेद  शास्त्रानुसार म्हणजेच ऋतुपथ्य  होय . ऋतुचर्यामध्ये जीवनशैली आणि  आहारातील बदल याचा समावेश होतो.  हवामानातील बदल म्हणजेच ऋतूतील बदल या काळाला ऋतुसंधीकाळ असेही संबोधले जाते. या ऋतुसंधीकाळामध्ये आयुर्वेदिक नियमानुसार आधीच्या ऋतुचर्येचा अगदी अचानक बदल न करता हळूहळू त्यामध्ये बदल करून नवीन ऋतुचर्येचे पालन करण्यास सुरुवात केली पाहिजे. तरच ते शरीर प्रकृतीला बाधक ठरत नाही आणि  कोणत्याही व्याधी वाढत नाही. ऋतुचर्या आणि  आयुर्वेदिक जीवनशैली कशी  असावी याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.  आयुर्वेदानुसार भारतीय हवामानाच्या संदर्भात सहा ऋतूंचे वर्णन केले आहे.

सहा ऋतू, आहार अणि जीवनशैली-

1) शिशिर ऋतू

 हा ऋतू  जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये येतो. या हंगामात वातावरण थंड आणि वादळी राहते त्यामुळे कफ दोषाचा विक्षेप होतो आणि पाचकअग्नी (अपचय) उच्च अवस्थेत राहतो.

आहार :-आवळा (तुरट ), तृणधान्य, कडधान्य,गहू,बेसन, आलं, लसूण, नवीन तांदूळ, मका , दूध आणि दुधाचे पदार्थ  इ. चा समावेश करावा. कटू (तिक्ष्ण ), तिक्त (कडू ), लघु (हलके) आणि शीत(थंड) पदार्थ   वर्ज्य करावेत.

जीवनशैली :- तेलाने मसाज करावे किंवा कोमट पाण्याने शॉवर घ्यावे ,  सूर्यप्रकाशात जावे आणि उबदार कपडे घालावे.

2) वसंत ऋतू :-

वसंत ऋतू  मार्च ते एप्रिल मध्ये येतो . या काळात  बाहेरील  वातावरणात उष्णता हळूहळू वाढत जाते. या काळामध्ये कफदोषाचा त्रास वाढू लागतो, त्यामुळे कफदोषयुक्त विकार वाढू लागतात जसे की – सर्दी, खोकला, ताप. भूक मंदावते,  पचनशक्ती मंद अवस्थेत राहते.

 आहार :- सहज पचणारे पदार्थ तृणधान्य,गहू, तांदूळ , कडधान्य, मसूर, मुगडाळ  इत्यादी खाता येतात. हिंग, मोहरी, आले, मिरची, दालचीनी, लसूण हे  पदार्थ घ्यायला हरकत नाही. कडू, तिखट, तुरट, मध  हे पदार्थ खावेत. थंड,जड आणि चिकट पदार्थ टाळावे.

जीवनशैली :-व्यायाम करणे आवश्यक आहे. दिवसा झोपणे टाळावे, आंघोळीसाठी कोमट पाणी वापरावे.

3) ग्रीष्म ऋतू :-

ग्रीष्म ऋतू  मे  ते जुन मध्ये येतो. हा हंगाम वातावरणात तीव्र उष्ण आणि अस्वस्थ्यकारक असतो. व्यक्तीची ताकद कुमकुवत होते.  कफ दोष या ऋतूत शिथिल असतो व्यक्तीचा  अग्नी सौम्य स्थितीत राहतो.

आहार :- मधुर (गोड), स्निग्ध ,शीत(थंड) आणि द्राव( द्रव )गुण असलेले पदार्थ- उदाहरणार्थ तांदूळ, मसूर इत्यादी खावे. भरपूर पाणी आणि वेगवेगळे द्रव जसे की थंड पाणी, ताक, फळांचे रस, आंब्याचा रस,मिरे पुडसह ढवळलेले दही  घ्यावे. लवण ( खारट ) आणि कटू (तिक्ष्ण ), आवळा  असे पदार्थ टाळावेत.

 जीवनशैली :- थंड ठिकाणी राहणे, हलके सुती कपडे घालणे उपयुक्त आहे. जास्त व्यायाम किंवा कठोर परिश्रम टाळले पाहिजे.

Untitled design 5 1

4) वर्षा ऋतु-

वर्षा ऋतु मध्ये जुलै ते ऑगस्ट मध्ये येतो. या हंगामात शक्ती कुमकुवत होते. वात दोष आणि पित्त दोष निक्षेपाने अग्नी देखील मंदावतो.

आहार :- आवळा आणि लवंग (खारट) चव आणि स्नेह गुण असलेले पदार्थ खावेत. धान्य जुनी बार्ली, तांदूळ, गहू इ. घ्यावे. मांसाहार टाळावा.

जीवनशैली :- शरीराला तेलाने व्यवस्थित मालिश करून गरम पाणी अंघोळीसाठी वापरणे. जड व्यायाम, पावसात भिजणे, दिवसा झोपणे टाळावे. तसेच विकृत दोषांना बाहेर काढण्यासाठी  त्रिफळा चूर्ण +कोमट पाणी घ्यावे.

Untitled design 5 2

5)शरद ऋतू :-

शरद ऋतू  सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये येतो. या हंगामात अग्नीची हालचाल वाढते.

आहार :- मधुर गोड, तिखट चव असलेले, थंड आणि हलके गुणधर्म असलेले पदार्थ घ्यावे.  जसे कि भात, ज्वारी, मूग, मटकी,  दूध व तूप, गरम, कडू, गोड आणि तुरट, चरबीयुक्त, तेलकट, मांस,दही पदार्थ वगळावेत.

जीवनशैली :-जेव्हा भूक लागते तेव्हा अन्न खाण्याची सवय करावी., दिवसा विश्रांती घ्यावी. सूर्याप्रकाशाचा अति  संपर्क आणि अति खाणे टाळावे.

6)हेमंत ऋतू :-

हेमंत ऋतू – नोव्हेंबर ते  डिसेंबर मध्ये  येतो. या हंगामात शरीरातील ऊर्जा उच्च राहते.. अग्नीची क्रिया वाढते  त्यामुळे विकृत पित्त दोष कमी होतो.

आहार :-गोड, चवदार आणि खारट, धान्य, तांदूळ, पिठाची मांडनी , हरभरा इ. खावे. गहू, उडीद, साखर, दुध, तेल, तुप भरपूर घ्यावे. तुर, मुग, मटकी, वाटाणा,  घ्यावेत. दुधाचे सर्व पदार्थ आहारात असावेत. हेमंत ऋतूत रात्र मोठी व दिवस लहान असतो.  सकाळी  पोटभर न्याहारी करावी.  वात वाढवणारे, हलके, थंड आणि कोरडे पदार्थ टाळावे.

 जीवनशैली :- शरीर आणि डोके तेलाचा मसाज करावा, व्यायाम, सूर्य स्नान, उबदार कपडे आणि ऊबदार ठिकाणी राहावे . दिवसा विश्रांती आणि जोरदार थंड वाऱ्याचा संपर्क टाळावा.

ऋतूबदला नुसार पाचकअग्नी आणि शक्ती

ऋतूपाचक अग्नीशक्ती  
शिशिर ऋतूउच्चउच्च
वसंत ऋतूमध्यममध्यम
ग्रीष्म ऋतूमंदमंद
वर्षा ऋतुमंदमंद
शरद ऋतूमध्यममध्यम
हेमंत ऋतूउच्चउच्च

सारांश

ऋतुचर्यामध्ये सांगितलेल्या आहाराचे सेवन करताना हे लक्षात घ्यायला हवे कि ऋतूचा शेवटचा आठवडा आणि येणाऱ्या ऋतूचा पहिला आठवडा हळूहळू आधीच्या आहाराचा त्याग करून नवीन ऋतूसाठी सांगितलेल्या आहाराचे पालन करणे आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. ऋतूबदल झाल्यानंतर अचानक जर तुम्ही  नवीन ऋतूनुसार अन्न  घेण्यास सुरुवात केली तर  आजार निर्माण होऊ शकतात. आपण निसर्गाला अनुकूल आयुर्वेदिक दिनचर्या आणि आहाराच्या सवयी पाळल्या पाहिजेत. त्यामुळे आपण ऋतू बदलाच्या वेळी दोषांच्या प्रभावामुळे होणाऱ्या विकारांपासून निश्चितच मुक्त राहू.

उन्हाळ्यात काय खावे?

उन्हाळ्यात हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन केल्याने शरीर सक्रिय राहते. त्यामुळे टरबूज, खरबूज, काकडी खाणे फायदेशीर आहे. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही.

आयुर्वेदानुसार ऋतुचर्या म्हणजे काय?

ऋतुचार्य आपल्याला ऋतुमानातील बदलांमुळे होणाऱ्या रोगांशी लढण्यासाठी आपली शारीरिक शक्ती आणि मानसिक क्षमता निर्माण करण्यास सक्षम बनवते. शिवाय, ते आपल्या शरीरातील तिन्ही दोषांचे संतुलन करते आणि आपल्याला वर्षभर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top